कधि अवतरशी भारत भूवर

कधि अवतरशी भारत भूवर? सख्या चापपाणी ?।

ऐक, ऐक बा! करुणा रामा! घे अपुल्या कानी |।धू० ।।

वेद्‌-शास्त्र-मर्यादा सगळी, विसरुनिया गेली।

माय-लेक की, बाप-पुत्र ही, याद नष्ट झाली।।१ ।।

अकालि रोगी मरती, क्षय-महारोगाची भरती ।

खाया न मिळे अन्न पुरेसे, पीकहि ना दे धरती।।२।।

असत्यता ही जिकडे तिकडे, प्रेम नसे कोठे ।

तुकड्यादास म्हणे जे बदलो, जरा नसे खोटे।।३॥।